बलि प्रतिपदा
बळी राजाने स्वर्ग, मुत्यु आणि पाताळ हे तिन्ही लोक जिंकले. तेव्हा देवांच्या प्रार्थनेवरुन भगवान श्रीविष्णुने वामनावतार धारण केला अन दान म्हणुन बळीराजाकडून हे तिन्ही लोक परत मिळविले. परमेश्वराचे षड्यंत्र बळीला उअमजले होते. तरीही त्याने वामनाची इच्छा पूर्ण केली. विष्णुला हे नविन होते. बळीच्या दातृत्त्वावर प्रसन्न होऊन त्याने त्यास, "पाताळात जाऊन वास्तव्य कर !" अशी आज्ञा केली. शिवाय बळीने दरवर्षी पृथ्वीवर येऊन मानवांकडून पूजा करून घ्यावी असा आदेश दिला. म्हणून बलिप्रतिपदेला आपण बलिपूजन करतो.
नमंदेच्या उत्तरेकडील भारतीय जे विक्रम संवत्सर पाळतात. त्या संवत्सराची सुरवातही बलिप्रतिपदेपासून होते. त्यामुळे भारतात हा दिवस वर्षारंभाचा दिवस मोठ्या प्रमाणात पाळण्यात येतो.
यमद्वितीया
दीपावलीतील शेवटच्या महत्त्वाचा दिन यमद्वितीया हा होय. आपण महाराष्ट्रीय यास 'भाऊ-बीज' म्हणतो. इतर लोक 'भाई-दूज' म्हणतात. या दिवशी यमराज आपली बहीण यमुना हिला भेटावयास गेले होते.
बंधु-भगिनीचे प्रेम वृद्धिगत करणारा हा दिवस होय. बहुतेक भाग्यवान भाऊ आपल्या भाग्यवान बहिणीला या दिवशी भेटतात. रात्रौ बहीण भावाला ओवाळते. भाऊ ऐपतीप्रमाणे प्रिय भगिनीस ओवाळणी घालतो.
दिवाळी हा भारताचा पुरातन सण आहे. भारतात प्रत्येक ठिकाणी, तसेच भारतीय परदेशात जिथे जिथे असतील तिथे 'दीपावली' अपरिमित उल्हासाने साजरी होते. या सणानिमित्त स्नेह्यांना फराळाला किंवा पानसुपारीला बोलावण्याचा प्रघात आपल्यात आहे.

0 अभिप्राय:
Post a Comment