Saturday, December 1, 2007
Friday, November 30, 2007
पहारेकरी (चंपक - सप्टेंबर २००७)
Thursday, July 26, 2007
सिंहासन बत्तिशी - कथा दुसरी - भाग ८
परत आतून धीरगंभीर आवाज आला ---
मित्रदोही कृतघ्नश्च तथा विश्वासघातक: ।
त्रयस्ते नरकं यांति यावश्चंद्र दिवाकरी ॥
मित्राचा घात करणरा, उपकार न स्मरणारा, विश्वास्घात करणारा, हे तिघे जोपर्यंत हे चंद्रसूर्य प्रकाशत आहेत तोपर्यंत नरकांत राहतात.
आतां विजयपाल फक्त 'रा' 'रा' असेच म्हणूं लागला. सारेजण पडद्याकडे उत्सुकतेनें बघत होते. सर्वांच्या नजरा आदरामिश्चित कौतुकानें भारल्या होत्या. राजाचे डोळ्यात आनंदाश्रु उभे होते. तेवढ्यात स्वर उमटले ----
राद्वांतः सर्व शास्त्रणामयं न कलुर्ष परम ।
विश्वास्गातात्पुत्यं च न परोपकृतै: परम ॥
सर्व शास्त्रांचा सिद्धांत आहे की, विश्वासघाताएवढे मोठे पातक नाहीं व परोपकाराएवढें दुसरें कोणातेंच पुण्य नाही.
हा श्लोक ऐकतांच राजपुत्राचे वेड एकदम नाहीसें झालें, त्यांने सर्वांना प्रणाम केला व रानांत घडलेली हकीकत सर्वांसमक्ष वडिलांना सांगितली. राजा मोठ्या आनंदाने पडद्याकडे वळून म्हणाला, 'हे मुली - तू तर गोषा सोडून कुठेही जात नाहीस; मग तुला हे सर्व कसें काय कळाले ते मला मांग़ ! माझी फार इच्छा आहे - मी तुझ्यावर एकदम खुष आहे.'
Tuesday, July 24, 2007
सिंहासन बत्तिशी - कथा दुसरी - भाग ७
झाले ! प्रधनानें निरोप सांगितल्यानंतर सर्व व्यवस्था करण्यात आली. 'ससेमिरा' या नांवाचा जप करणाऱ्या विजयपालला तिच्यासमोर आणून बसविलें. पडद्याच्या आंतून आवाज आला --
सदभावप्रतिपन्नां वंचने का विदग्धता ।
अंकभारुह्य सुप्तानां हंतु: किं नाम पौरुषम ॥
हे युवराजा, तुझ्यावर ज्यांने पूर्ण विश्वास ठेवला त्याचा विश्वासघात करण्यांत कोणते चातुर्य आहे ? आपल्या मांडीवर विश्वासानें मान ठेवलेल्याचा प्राण घेण्यांत कोणता पराक्रम आहे ?
हा श्लोक ऐकतांच राजपुत्र थोडा सांवरुन बसला. त्यांने 'स' हे अक्षर सोडून दिले व तो 'सेमिरा' असें बडबडू लागला. तेवढ्यात आंतून परत आवाज आला --
र्सेंतुं गत्वा समुद्रस्य गंगासागर संगमम ।
ब्रह्मघ्नोऽपि विमुच्येत मित्रद्रोही न मुच्यते ॥
सेतुबंध रामेश्वराला अथवा गंगा आणि सागर यांचा जेथें संगम झाला त्या तिर्थक्षेत्राला गेलं असतां ब्रह्महत्या करणारादेखील त्या पापापासून मुक्त होतो. परंतु मित्रद्रोही मात्र मित्रदोहाच्या पापापासून कोठेंही मुक्त होऊं शकत नाही.
एवढें ऐकल्यावर राजपुत्र बराच शांत झाला. राजाही थोडा आनंदित दिसू लागला. असलेले लोक वाहवा ! वाहवा !! म्हणूं लागले. राजपुत्र आतां 'मिरा' 'मिरा' एवढी दोन अक्षरेच म्हणूं लागला.
सिंहासन बत्तिशी - कथा दुसरी - भाग ६
इकडे त्याचा घोडा नगरांत जाऊन पोहोंचला होता. घोडा एकटाच आलेला पहातांच व्याकुळ झालेला राजा त्याच घोड्यावर बसून विजय्पालाच्या शोधावर निघाला. रानांत त्याल एक वेडा दिसला. पण निरखून पहातांच, तो आपलाच पुत्र आहे हें राजानें ओळखलें. विजयपालाला घेऊन राजा घरीं आला. अनेक वैद्य, हकीम आले. खूप औषधोपचार केले, पण राजपुत्राला गुण येईना. उलट 'ससेमिरा' ह्या नावांचे वेड वाढतच चालले. खिन्न झालेला राजा प्रधानाला म्हणाला, 'आज माझे गुरु शारदानंद असते तर त्यांनी याला बरे केले असते.' प्रधान गांवात दवंडी देऊन बघू या - शारदानंदांसारखा एखादा विद्वान कदाचित युवराजांना बरें करूं शकेल.'
बुडत्याला काडीचा आधार वाटतो त्याप्रमाणे राजाला या सूचनेनें थोडा आधार वाटला. त्यानें ताबडतोब दवंडी देण्याचा हुकुम सोडला. इकडे प्रधान घरी आला व शारदानंदांना नमस्कार करून त्यांने सर्व हकीकत सांगितली.
शारदानंदांनीं समाधी लावली. अंतर्ज्ञानानें त्यांना राजपुत्राची सारी हकीकत समजली. थोडा वेळ गेला. गुरुनें डोळे उघडलेले पाहतांच प्रधानानें परत प्रणाम केला. हंसतच शारदानंद म्हणाले, 'वत्सा, तूं राजाला जाऊन सांग़, माझी कन्या फार चतूर आहे. ती राजपुत्राला बरें करील. मात्र ती पडदानशील असल्याने आंतच राहून बोलेल.'
Monday, July 23, 2007
जादुची भुकटी
विचारात गुंग असलेले चोरोबा कुणाच्या तरी अंगावर आदळले. तो एक साधू होता. साधू बघताच चोरोबांना फार आनंद झाला.
एकदम लोटांगणच घातले बोवाजीपुढे. बोवाजींनी आशीर्वाद दिला, "बेटा, सुखी रहा !"
तरी चोरोबांनी साधू - चरणांवरून डोके उचलले नाही.
"बेटा, काय हवं तुला ? तू मांगशील ते मी देईन."
"साधू महाराज, मी एक चोर आहे. मला चोरी करतानाच नेहमी शिपाई पकडतात. तरी अशा वेळी मला कोणी बघू शकणार नाही असं करा."
साधूबाबांच्या गालांना खळी पडली. ते वदले, "ठीक ! ही घे जादूची भुकटी. ही नाकानं ओढताच तू दिसेनासा होशील, जा."
चोरोबा खूष झाले.
चांदोबा डोईवर आला. भुकटी डबी कंबरेला खोचून ते कमगिरीला निघाले. सावकाराचं घर आलं. चोरोबांनी भिंत पार केली. खिडकीतून तिजोरीजवळ गेले. तिजोरी उघडायचे सामान मेजावर ठेवले. आणि साधूबाबांचे नाव घेत जादूची भुकटी नाकात कोंबळी.
"फाड ..... ! फाड ....... !! ओऽऽ कं..... शी ! !"
चोरोबांना शिकांनी अगदी हैराण केले.
जानवे चचपत सावकार उठला. दंडे सावरीत नोकर उठले..... दिवे लागले.... उजेडात तिजोरीशी खाट - खुट करीत असलेले चोरोबा दिसले.
ताबडतोब या मंडळीनी चोराला पकडले. भोळसट चोरोबांना जादूची भुकटी चांग़लीच भोवली ! कारण ती तपकीर होती.
Sunday, July 22, 2007
सिंहासन बत्तिशी - कथा दुसरी - भाग ५
नदी, तीक्ष्ण नखं असलेली जनावरें, शिंगाचे पशु, हत्यारबंद माणूस, स्त्रिया व राजे यांचा कधीहि विश्वास धरुं नये असे नीतिशास्त्र सांग़ते म्हणुन तूं या अस्वलास खाली ढकलून दे. मी त्याला खाऊन निघून जाईन.
राजपुत्राला वाघाचें बोलणें पटले व त्यानें बेसावध अस्वलास खालीं लोटून दिले. पण अस्वल सावध होते. त्यांने खाली पडता पडता झाडाची फांदी पकडली. आतां विश्वासघात केलेला राजकुमार थरथर कापु लागला. अस्वल आपल्याला मारणार अशी त्याची पुर्ण खात्री झाली.
पण अस्वल म्हणाले, 'हे स्वार्थी प्राण्या, मी तुझ्या शरीराला कांहिही अपाय करणार नाही. माझी तशी इच्छाच नाही. पण तुला कांहितरी शिक्षा ही हवीच तुला 'ससेमिरा' याच शब्दाचे माझ्या शापामुळे वेड लागेल, आणि ही चार अक्षरे चार श्र्लोकांच्या प्रारंभी असलेले माझ्या मनांत असलेले चार श्र्लोक जर तुला कुणी ऐकवले तरच तुझे वेड जाईल. तेव्हां आतां घरीं निघुन जा.'
आतां पहाट झालीच असल्यानें वाघ व अस्वल आपापल्या घरीं निघून गेले. अस्वलाने दिलेल्या शापामुळे राजपुत्र विजयपाल 'ससेमिरा-ससेमिरा' असें ओरडत रानांत हिंडू लागला.
सिंहासन बत्तिशी - कथा दुसरी - भाग ४
त्याच झाडावर वाघाची चाहूल लागल्यामुळे एक अस्वल येऊन बसलेले होते. हे दुसरे संकट पुढें आलेले पाहून राजपुत्राचे हातपाय गळाले. पण ते अस्वल मनुष्यवाणीने म्हणाले, 'तु घाबरु नकोस ! मी तुला वचन देते, मी तुझा घात करणार नाही.' आतां विजयपालला थोडा धीर आला. तो व अस्वल जवळजवळ बसून राहिले. भक्षाचा वास आल्यामुळें वाघही तेथून हलायला तयार नव्हता. तोही त्या झाडाखालीच उभा राहिला.
दमलेल्या विजयपालला झोप येऊ लागली. अस्वल मोठ्या प्रेमाने त्याला म्हणाले, 'तूं झोप, मी पहारा करते. तुला मी खाली पडूं देणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव.'
अस्वलावर पूर्ण विश्वास बसलेला विजयपाल झाडाच्या खोडाला टेकून स्वस्थ झोंपला.
त्याला झोंप लागल्यावर वाघ म्हणाला, 'अस्वला, तूं व मी अरण्यांत राहणारे, म्हणून भाऊ भाऊ आहोंत. हा मनुष्य आपला शत्रू आहे. तूं याला हलकेच खालीं ढकलून दे म्हणजे माझी भूक शांत होईल व मी निघून जाईन.'
पण अस्वलाने उत्तर दिलें -- 'वाघा, तूं सांगतोस हें खरे असलें तरी मी या माणसाला माझा शब्द दिला आहे. मी विश्वासघात करणार नाहीं.'
वाघाचा नाइलाज झाला. मध्यरात्र झाली. विजयपालची झोप पुरी झाली. आता थकलेलें अस्वल झोपी गेले. वाघ खाली उभा होताच. तो राजपुत्राला म्हणाला --
नदीनां च नखीनां च श्रृंगीनां शस्त्रपाणिनाम ।
विश्वासो नैव कर्तंव्य: स्त्रीषु राजकुशलेष्वपि ॥
Saturday, July 21, 2007
दिवाळीच्या गोष्टी - भाग २
बलि प्रतिपदा
बळी राजाने स्वर्ग, मुत्यु आणि पाताळ हे तिन्ही लोक जिंकले. तेव्हा देवांच्या प्रार्थनेवरुन भगवान श्रीविष्णुने वामनावतार धारण केला अन दान म्हणुन बळीराजाकडून हे तिन्ही लोक परत मिळविले. परमेश्वराचे षड्यंत्र बळीला उअमजले होते. तरीही त्याने वामनाची इच्छा पूर्ण केली. विष्णुला हे नविन होते. बळीच्या दातृत्त्वावर प्रसन्न होऊन त्याने त्यास, "पाताळात जाऊन वास्तव्य कर !" अशी आज्ञा केली. शिवाय बळीने दरवर्षी पृथ्वीवर येऊन मानवांकडून पूजा करून घ्यावी असा आदेश दिला. म्हणून बलिप्रतिपदेला आपण बलिपूजन करतो.
नमंदेच्या उत्तरेकडील भारतीय जे विक्रम संवत्सर पाळतात. त्या संवत्सराची सुरवातही बलिप्रतिपदेपासून होते. त्यामुळे भारतात हा दिवस वर्षारंभाचा दिवस मोठ्या प्रमाणात पाळण्यात येतो.
यमद्वितीया
दीपावलीतील शेवटच्या महत्त्वाचा दिन यमद्वितीया हा होय. आपण महाराष्ट्रीय यास 'भाऊ-बीज' म्हणतो. इतर लोक 'भाई-दूज' म्हणतात. या दिवशी यमराज आपली बहीण यमुना हिला भेटावयास गेले होते.
बंधु-भगिनीचे प्रेम वृद्धिगत करणारा हा दिवस होय. बहुतेक भाग्यवान भाऊ आपल्या भाग्यवान बहिणीला या दिवशी भेटतात. रात्रौ बहीण भावाला ओवाळते. भाऊ ऐपतीप्रमाणे प्रिय भगिनीस ओवाळणी घालतो.
दिवाळी हा भारताचा पुरातन सण आहे. भारतात प्रत्येक ठिकाणी, तसेच भारतीय परदेशात जिथे जिथे असतील तिथे 'दीपावली' अपरिमित उल्हासाने साजरी होते. या सणानिमित्त स्नेह्यांना फराळाला किंवा पानसुपारीला बोलावण्याचा प्रघात आपल्यात आहे.


